vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

    राज्य प्रतिनिधी- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर या भागातील जनतेने माझ्यावर प्रेम केले. माझे नेतृत्व रेणापूर तालुक्यातील जनतेने जोपासले हे कदापि विसरू शकत नाही मला मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात, वाडी वस्तीत जे जे कामे करणे शक्य आहे. ती सर्व विकास कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून जवळगा येथील आरोग्य उपकेंद्रास लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार असे सांगून जवळगा गावच्या विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशीह ग्वाही भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे जवळगा येथील आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना दिली.

       राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रेणापूर तालुक्यातील मौजे जवळगा (सेलु) येथे 44 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्ताने आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते मंगळवारी झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय रमेश पाटील हे होते तर याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीधर रेड्डी, खरोळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ परमेश्वर धप्पाधुळे, डॉ महेश पटाई, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ ज्ञानेश्वर खरोळे, भाजपाचे सतीश आंबेकर, अनिल भिसे, डॉ बाबासाहेब घुले, ओमप्रकाश गोडभरले, दशरथ सरवदे, रामराव मोरे, सुधाकर काळे, लक्ष्मण यादव, वसंत करमोडे, दिनकर राठोड, भाऊसाहेब गुळबिले, शेख जमील उपसरपंच निवृत्ती चिद्रे, नारायण राठोड यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी बोलताना आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी गती मिळत असून गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपाच्या नेतृत्वाने करून दाखविले आहे. प्रत्येक समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असून गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अनेक जनहिताच्या योजना सुरू करून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहे

संबंधित पोस्ट

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित,महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

आज संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन*संविधान दिन अमृत महोत्सवात कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार

vishwatmaklokswamivarta

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

vishwatmaklokswamivarta