vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?

राज्य प्रतिनिधी-

राज्यातून मोठ्या विश्रांतीवर गेलेल्या पावसानं टप्प्याटप्प्यानं दमदार आगमन केलं असून आता हाच पाऊस थेट मुंबईतही बरसताना दिसत आहे. अधूमधून असणाऱ्या जोरदार सरी आणि त्यातच मध्ये उसंत घेणारा हा पाऊस कोकणा आणि घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये जोर धरताना दिसत आहे.

कोकणात प्रामुख्यानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाच्यचा धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या जोरदार सरींची बरसात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

केंद्रीय हवामानशास्त्रानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 21 ते 27 जुलैदरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण ओडिशावर चक्राकार परिस्थिती निर्माण होत असून कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत एक ट्रफ रेषा हवामानाच्या एकंदर स्थितीवर परिणाम करत आहे. सदर भागांमध्ये पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत असल्या कारणानं राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

कसा सुरू आहे पावसाचा प्रवास?

24 जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात उत्तर कमी दाबाचं क्षेत्र नव्यानं तयार होण्याची अपेक्षा असून, परिणामी मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादरम्यान वादळी वाऱ्यांचीसुद्धा शक्यताना नाकारता येत नसून, वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतरा राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार

येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात वादळी वाऱ्यांचा वेग आणि जोर अधिक राहणार असल्यानं मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

समता पंधरवाडात विविध उपक्रमाचे आयोजन; सहभागी होण्याचे आवाहन

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’छायाचित्रे पाठविण्यासाठी 02 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान..

vishwatmaklokswamivarta