vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी हा भारतीय टपाल विभागाच्या लातूर विभागामार्फत जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार सेवांचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आता लातूर जिल्ह्यातील प्रमुख १० टपाल कार्यालयांमध्ये नवीन आधार नोंदणी आणि आधार दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.

टपाल विभागाच्या या कार्यालयांमध्ये मिळणार सुविधा,लातूर विभागातील अहमदपूर (भ्रमणध्वनी क्र. ७३८७१००४०८), औराद शहाजनी (भ्रमणध्वनी क्र. ९१४५६०१६५२), औसा (भ्रमणध्वनी क्र. ७७५८०७५६११), लातूर जुने रेल्वे स्टेशन (भ्रमणध्वनी क्र. ९३०७३८५११३), चाकूर (भ्रमणध्वनी क्र. ७७४५०११५४७), किल्लारी (भ्रमणध्वनी क्र. ७०५७६००८५०), गांधी चौक लातूर मुख्य टपाल कार्यालय (भ्रमणध्वनी क्र. ७७०९७९७५९६), मुरूड (भ्रमणध्वनी क्र. ७०८३३६५००६), निलंगा (भ्रमणध्वनी क्र. ८७९३७२४९०४) आणि उदगीर (भ्रमणध्वनी क्र. ७७६७८४८६२४) या टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. संबंधित केंद्रांच्या नावापुढे दिलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिक अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात.

या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी करणे, आधार कार्डावरील मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदलणे तसेच बायोमेट्रिक माहिती (ठसे व डोळ्यांचे स्कॅनिंग) अद्ययावत करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. विशेषतः ज्या नागरिकांचे आधार जुने झाले आहे किंवा ज्यांना कागदपत्रे अद्ययावत करायची आहेत, त्यांच्यासाठी ही सोय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आधार सेवा घेताना काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा संबंधित कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्यास, नागरिकांच्या मदतीसाठी ८२७५००२८०५ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर संदेश पाठवून नागरिक आपली समस्या मांडू शकतात.

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधारशी संबंधित कामांसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधून या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे सहाय्यक अधीक्षक (डाकघर) श्रीकांत माने यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय-विद्यार्थ्यांना मिळणार सुरक्षित मार्ग..

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने

vishwatmaklokswamivarta