vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

जालना/प्रतिनिधी,जालना जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या जालना समाचार वृत्तपत्राचे वर नांव लावून खाली बनावट वृत्तपत्राची जेपीजी फाईल तयार करून सोशल मीडियावर दुसर्‍याचे बदनामीकारक मजकूर व्हायरल करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून त्याच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

याबाबत सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रमुख भारती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना समाचार या वर्तमानपत्राचा मालक मी मालक, मुद्रक, संपादक आहे. अज्ञात व्यक्तीने जालना समाचार वर्तमानपत्राच्या नावाचा गैरवापर करून बनावट जे.पी.जी. तयार केली आहे. सदर जेपीजीमध्ये जालना शहरातील व्यापारी सुभाष देवीदान, पार्श्‍वभुमीचे संपादक दिलीप राठी यांचे कार्टून व बदनामीकारक मजकूर टाकून सोशल मीडियावर व्हायरल केले.

त्या पोस्टशी जालना समाचार वृत्तपत्राचा कोणताही संबंध नाही. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक जालना समाचारची फसवणुक केली. तसेच प्रतिष्ठीत व्यापारी व संपादक यांची बदनामी करीता सोशल मीडियाचा गैरवापर करून खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात य आली आहे. या प्रकरणाची सायबर सेलमार्फत सखोल चौकशी करून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा व त्याच्यावर भारतीय न्याय संहिता , माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच लागू असलेल्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

vishwatmaklokswamivarta

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

मा उच्च न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत आर आर डुकरेनां सेवा निवृत्ती चा लाभ देऊ नका-प्रशांत डोंगरदिवे मा. उच्च न्यायाल्याने दिले 31 जुलै ला हजर राहण्याचे आदेश

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.  

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta