vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई* 

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई*

 

सातारा प्रतिनिधी- किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामाला गती देण्याबरोबरच हे काम दर्जेदार करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी किल्ले प्रतापगड येथे सुरू असलेल्या संवर्धन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व किल्ले प्रतापगड येथील नागरिक उपस्थित होते

किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या बांधकामाला पाणी मारत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडावर कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तरी संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी आणून पाणी मारावे. संवर्धनाच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष आहे. तरी संवर्धनाच्या कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे किल्ले प्रतापगड होता त्याच पद्धतीने संवर्धनाचे काम झाले पाहिजे. किल्ल्यावरील झाडेझुडपे काढून संवर्धनाचे काम करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ जास्तीत जास्त झाडे लावावी. संवर्धनाच्या कामाच्या निधीसाठी पाठपुरावाही केला जाईल अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री देसाई यांनी पाहणी दरम्यान दिली.

000

संबंधित पोस्ट

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार

पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी -पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सहाव्या बैठक..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास…

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा