vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

 सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अपर जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे दाखल असलेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, पलूस, कडेगाव, वाळवा, शिराळा व जत तालुक्यातील अर्धन्यायिक प्रकरणांच्या अनुषंगाने संबंधित तालुक्यांच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे दिनांक 25 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मिरज येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाळवा व शिराळा तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाळवा येथे, खानापूर व आटपाडी तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, विटा येथे, कडेगाव व पलूस तालुक्यांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कडेगाव येथे तर जत तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जत येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे.

 लोकअदालतीत सहभागी होणाऱ्या पक्षकार व विधिज्ञ यांनी नियोजनानुसार लोकअदालतीमध्ये सहभागासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक 19 जून 2026 अखेर संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अपील शाखेत सादर करणे आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प..

vishwatmaklokswamivarta

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

महिला सुरक्षितता, सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था आणि शहरातील आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावरील विशेष कार्यशाळा

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta