vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठी घोषणा

आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज – अमित शहा

दिल्ली प्रतिनिधी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्थापनेला १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मोठी घोषणा केली आहे. २५ राज्यातील ३० पूरग्रस्त जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर आपत्ती मित्र ही योजना सुरु करण्यात आली आहे.

आपत्ती मित्र योजनेत ५ हजार ५०० आपत्ती मित्र आणि मैत्रिणींचा समावेश आहे. आता ही योजना ३५० आपत्तीग्रस्त जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

अमित शहा म्हणाले की, काही सेकंदात आपत्तीत काम सुरु करावं लागतं. हे काम जनताच करु शकते. गावागावात आपत्ती मित्रच हे करू शकतील. आपत्ती मित्र ही संकल्पना खूप चांगली आहे. आपत्तीला सामोरं जाण्यासाठी जनतेला तयार करण्याची गरज असल्याचंही अमित शहा यांनी म्हटलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग भारतात आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करते. यंदा स्थापना दिनाचा विषय हा हिमालयातील आपत्तीच्या घटनांचा होणारा परिणाम आहे. या कार्यक्रमात हिमालयातील भूस्खलन, ढगफुटी, भूकंप, ग्लेशिअर वितळून येणाऱ्या आपत्ती इत्यादींवर सविस्तर चर्चा होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्‍यांना मदतीची मागणी करणार्‍या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील  आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार  कालावधीत यलो अलर्ट जारी उष्णतेची लाट  काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर,दहशतवादी हल्ल्याचे सावट; दिल्ली ते काश्मीरसह मुंबईपर्यंत हाय अलर्ट

विधानसभानिवडणूक२०२४: राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार . यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले

vishwatmaklokswamivarta