vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील  आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट

मनोज जरांगे पाटील यांना-मुंबई सीएसटीतील  आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश; आंदोलनाला नवा ट्विस्ट…

मुंबई प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे” या प्रमुख मागणीवर ते ठाम आहेत. सुरुवातीला पोलिसांनी काही अटी-शर्तींसह या आंदोलनाला परवानगी दिली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगून सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांनी व्यापलेले रस्ते त्वरित रिकामे करण्याचे आदेश दिले.

याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवारी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आझाद मैदान व परिसरातील रस्ते मोकळे करून दुपारी  पर्यंत जागा स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेश न पाळल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देखील दिला गेला आहे.

जरांगे पाटलांचा मात्र ठाम पवित्रा आहे – “मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.” त्यामुळे पोलिसांच्या नोटिशीला ते कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच काही मंत्र्यांची बैठक पार पडली असून आज सरकारकडून जरांगे पाटलांना एक अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलनाचे स्वरूप आणि सरकारचा पुढील निर्णय यावर आजची सुनावणी निर्णायक ठरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की आंदोलन शांततेत, नियम व अटींचे पालन करून व्हावे, अन्यथा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होईल. दुपारी १ वाजता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता न्यायालयीन आदेश आणि जरांगे यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

चित्रपट निर्माता – निर्देशक प्रकाश मेहरा यांना अभिवादन…!

तंत्रज्ञान क्षेत्रात विदर्भ पुढे जाण्यासाठी कॉम्पेक्स प्रदर्शन महत्वाचे ठरेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉम्पेक्स-2025 प्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट,नागपूर एआयचे महत्वाचे केंद्र ठरेल  राज्यात इनोव्हेशन सिटी तयार होत आहे

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा- ‘अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा’वर लक्ष केंद्रित- स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नारी शक्ती वंदन’ हे विधेयक देशाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लावेल – खासदार नरेश म्हस्के ‘ नारी शक्ती वंदन’ विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा

दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्य16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीदिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये16 ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री..