vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

लातूर प्रतिनिधी-अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्याच्या तडाख्यामुळे मौजे वानवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी काशिनाथ सिद्धू निकम यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले, भिंती कोसळल्या, किराणा दुकान, पानटपरी आणि कष्टातून उभारलेला आरो प्लांट मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. अन्नधान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण आणि संसारोपयोगी साहित्याचीही मोठी हानी झाली. 😢

अशा कठीण प्रसंगी जनतेच्या वेदना स्वतःच्या मानणारे, विकासासोबतच माणुसकीची नाळ जपणारे लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. रमेशआप्पा कराड साहेब तात्काळ मदतीसाठी धावून आले. निकम कुटुंबीयांच्या संसारासाठी लागणारे संपूर्ण आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर खचलेल्या कुटुंबाला नव्याने उभे राहण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला.

लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ विकासकामे करणारा नव्हे, तर जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना उभारी देणारा आधारवड असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या कार्यातून आली. 🙇🏻‍♂️

संकटाच्या काळात दिलेला आधार हा आयुष्यभर लक्षात राहतो. निकम कुटुंबीयांच्या जीवनात आशेचा किरण बनून आलेल्या श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या या माणुसकीपूर्ण कार्याबद्दल परिसरातून त्यांचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.

0000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

स्व – संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर- जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते,जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने वीरांगना प्रशिक्षण सुरू

vishwatmaklokswamivarta