vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू

जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू

 

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे

या कालावधीत शस्त्रे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे जमा करणे, चिथावणीखोर घोषणा, भाषणे, गाणी, फलक किंवा अन्य साहित्याद्वारे सार्वजनिक शांतता भंग होईल अशा कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणुका, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना व इतरांकडून आंदोलन, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे-पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

शिक्षक साहित्यसंमेलन साहित्यामुळे जीवन प्रेरणा मिळते- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु