vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

जालना, प्रतिनिधी,  जालना शहरातील यशवंत नगर येथीलविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर व त्यांच्यासुविध्या पत्नी शोभाताई अंबेकर यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्तसपत्नीक महाआरती-महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी श्रीविठ्ठलाच्या

चरणी बा.. विठ्ठला..भरपूर पाऊस पडू दे.. अवर्षणाचे संकट दूर कर ..!आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला व सामान्य जनतेला सुखी करण्याचीप्रार्थना केली. यावेळी प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड,प्रा.डॉ.नारायणराव बोराडे, डॉ.मधुकर गरड, नरेंद्र वझरकर, सुभाषराव डीघे,अशोकराव देशमुख, मधुकर सिनगारे, सतीश जाधव यांच्यासह आदी नागरिकांचीउपस्थिती होती.      महापूजेनंतर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी तेथीलकॉलनीवासीयांच्या वतीने विकसित केलेल्या ओपन स्पेस ची पाहणी केली.नागरिकांनी स्वत:च्या व मिळालेल्या निधीचा अत्यंत चांगला वापर करून तसेचआपल्या जवळ जे आहे त्यातील थोडे समाजासाठी देण्याच्या भावनेतून सभामंडप,अभ्यासिका, सांस्कृतिक उपक्रम, डान्स क्लासेस, मोठ्या प्रमाणात करण्यातआलेली वृक्ष लागवड अशा अत्यंत आदर्श पद्धतीने नागरिकांनी कॉलनीतील ओपनस्पेस विकसित केल्याचे दिसून आले. तसेच परिसरातील सर्व लहान-थोर नागरिकवेगवेगळ्या सण-उत्सव व कार्यक्रम प्रसंगी एकत्र येत असल्याने अत्यंतचांगले सामाजिक सौहार्दाचे वातावरण तेथे अनुभवण्यास मिळते. याबद्दल तेथीलनागरिकांचे कौतुक केले.

    तसेच सेवानिवृत्तीनंतरही अत्यंत तळमळीने काम करणारेप्रा.श्री.नारायण बोराडे यांचेही माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनीविशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात आलेल्या सर्वपक्षीयनेत्यांच्या संबंधांचा उपयोग करून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींकडून येथीलविकास कामांसाठी निधी मिळवला तर अनेक प्रसंगी स्वत: ही खर्च केलाअसल्याचे अंबेकर यांनी नमूद केले. यावेळी श्री.भास्करराव अंबेकर यांनीआमदार अर्जुनराव खोतकर यांच्याशी संपर्क साधून तेथे आणखी काही विकासकामांसाठी पाच लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असताआमदार खोतकर यांनी तात्काळ विनंती मान्य करून निधी देणार असल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक 

vishwatmaklokswamivarta

कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली