vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर, प्रतिनिधी उजनी धरणात आज सकाळी १० वाजता ९३.८७ टक्के पाणीसाठा झाल्याने पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी केले आहे. पुणे जिल्हा व घाटमाथा परिसरासाठी भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दौंड येथील सरिता मापन केंद्रावर सध्या ७०,०८९ क्यूसेक्स पाण्याची आवक असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी ११ वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत ५,००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रातून १,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. पावसाचे प्रमाण व धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी विनंती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार, गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसाठी अतिवृष्टी, पूर, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन

येत्या चार वर्षात मुंबईतील चित्रपट नगरीचा कायापालट करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ‘फिक्की फ्रेम्स – अ सिल्वर जुबली ऑफ व्हिजन’ मुलाखत प्रसंगी केले आश्वस्त· सायबर क्राईम विरोधात “डिजिटल वॉरफेअर” मध्ये सहभागी होण्याचे चित्रपट उद्योगाला आवाहन

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

vishwatmaklokswamivarta

शांतता समितीची सभा; बकरी ईद सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील• गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी• जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे..

मुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार