vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणातून भीमा नदीत ६,६०० क्यूसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहिल्यानगर, प्रतिनिधी उजनी धरणात आज सकाळी १० वाजता ९३.८७ टक्के पाणीसाठा झाल्याने पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीत एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी केले आहे. पुणे जिल्हा व घाटमाथा परिसरासाठी भारतीय हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. दौंड येथील सरिता मापन केंद्रावर सध्या ७०,०८९ क्यूसेक्स पाण्याची आवक असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन आज सकाळी ११ वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीत ५,००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच जलविद्युत केंद्रातून १,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून एकूण ६,६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू आहे. पावसाचे प्रमाण व धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशी विनंती उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते व पीक कर्ज, उपलब्ध करुन द्या  – पालकमंत्री पंकजा मुंडे• जिल्ह्यात खरीप हंगामात 6 लाख 29 हजार हेक्टरवर होणार पेरणी..

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार*