vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी…

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी…

 

राज्य प्रतिनिधी: दिपावली सणाच्या काळात अन्नपदार्थत होणारी भेसळ रोखण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न प्राप्त होईल यासाठी अन्न औषध प्रशासन मार्फत सक्रियपणे कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक डेअरीची तपासणी करून दुधाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित डेअरींना नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या डेअरी स्वच्छतेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर परवाना निलंबन अथवा रद्द करणे या प्रकारचे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती (अन्न) अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिले आहे.

 

 

 

सणानिमित्त मिठाईसाठी खव्याची मागणी जास्त प्रमाणात असते हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने भेसळयुक्त खवा बाजारात येऊ नये या दृष्टीने अन्न औषध प्रशासन कारवाई करणार आहे त्याचप्रमाणे दही, तूप, पनी,र श्रीखंड, बासुंदी इत्यादी दुग्धजन्य पदार्थात जर भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. मागील दोन-तीन महिन्यामध्ये अन्न औषध प्रशासनामार्फत संबंधित कार्यालयाचे मुख्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार सातारा शहरातील कंदी पेढे उत्पादक पेढ्यांची तपासणी करून अन्न नमुने घेण्यात आले आणि स्वच्छतेचे पालन न करण्यात आलेल्या काहीवर दंडात्मक कारवाई देखील घेण्यात आलेली आहे या प्रकारची कारवाई आणखी घेतली जाणार आहे.

 

दूध, खवा, पनीर, मिठाई इतर तसेच दिवाळीच्या अनुषंगाने वापरात येणारे कच्चे अन्नपदार्थ जसे रवा आटा मैदा इ. सर्व अन्नपदार्थ बाबत भेसळीची माहिती प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासन यांना द्यावी, असे आवाहनही श्रीमती भोईटे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलिसा मध्ये गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण…

vishwatmaklokswamivarta

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

vishwatmaklokswamivarta

राज्यातील जनतेला रमजान ईदच्याशुभेच्छा,मानवकल्याण, विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार 

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठ ऑगस्टला ,सुप्रीम कोर्टाचा निर्णय…