vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे- अनंत विष्णू..

सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे- अनंत विष्णू..

 

 

( सुरेश गायकवाड ) मुंबई- समाजातील दारूबंदीवर भर देऊन आरोग्य,शिक्षण या मुलभूत गरजा मोफत देण्यासाठी तसेच कर्जमुक्त शेतकरी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्यास समाजातील अनेक प्रश्न आपोआप सुटतील. मात्र, सरकारची मानसिकता चांगली असणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत जय महाभारत पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विष्णु यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

 

     संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करून गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना निवारा, इंधनाला पर्याय म्हणून गोबर गॅस योजना, उत्तम मोफत शिक्षण, अधिकाधिक रुग्णालये बांधून मोफत उत्तम वैद्यकीय सेवा आणि औषधे देण्यासाठी आमच्या पक्षाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत असे अनंत विष्णु यावेळी सांगितले.

 

याशिवाय सर्व नद्या जोडून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्याऱ्यांना किमान आधारभूत किंमत, शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीची वेगळी आखणी, सर्वसामान्य नागरिक व खास करून सैनिकांच्या कुटुंबीयांना कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे असे अनंत विष्णु यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी कोरोनाच्या विळख्यात…

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची    – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

vishwatmaklokswamivarta

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम