vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

 

सांगली प्रतिनिधी : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली पाणी मागणी क्षेत्रीय अधिका-यांकडे द्यावी. ज्या क्षेत्रातील शेतकरी वेळेत पाणीपट्टी भरतील त्यांच्याकरीताच शाखा कालवा, वितरीका, लघुवितरीका यावरील गेट मधून प्राधान्याने पाणी सोडण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी रब्बी आवर्तनासाठी पाणी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. रा. कोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सन 2024-2025 मधील रब्बी आवर्तन दिनांक १० जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वेळेत पाणीपट्टीचा भरणा केल्यास नियमितपणाने सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच सद्यस्थितीत विद्युत देयकामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. तरी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाची रब्बी हंगामाची प्रस्तावित पाणीपट्टी प्रती द.ल.घ.फु. रु.23,839/- इतकी असून ती वेळेत भरुन सहकार्य करावे. दिनांक 10 जानेवारी पासून लाभक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये पाणी मागणी नमुना (7) भरुन घेण्याकरीता नियोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर विद्यार्थी, नागरिकानी स्पर्धेत ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

महाविस्तार एआय अप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा- ‘अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा’वर लक्ष केंद्रित- स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta