vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

 

सांगली प्रतिनिधी : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव व जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली पाणी मागणी क्षेत्रीय अधिका-यांकडे द्यावी. ज्या क्षेत्रातील शेतकरी वेळेत पाणीपट्टी भरतील त्यांच्याकरीताच शाखा कालवा, वितरीका, लघुवितरीका यावरील गेट मधून प्राधान्याने पाणी सोडण्यात येईल याची नोंद घ्यावी. तरी रब्बी आवर्तनासाठी पाणी मागणी अर्ज त्वरित भरून द्यावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. रा. कोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सन 2024-2025 मधील रब्बी आवर्तन दिनांक १० जानेवारी 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांनी वेळेत पाणीपट्टीचा भरणा केल्यास नियमितपणाने सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच सद्यस्थितीत विद्युत देयकामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात सुट देण्यात आली आहे. तरी लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सिंचनाची रब्बी हंगामाची प्रस्तावित पाणीपट्टी प्रती द.ल.घ.फु. रु.23,839/- इतकी असून ती वेळेत भरुन सहकार्य करावे. दिनांक 10 जानेवारी पासून लाभक्षेत्रामधील सर्व गावांमध्ये पाणी मागणी नमुना (7) भरुन घेण्याकरीता नियोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशी ल – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

सैय्यद लायकोद्दीन यांची रा.काँ शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.

बदलापुरमधील 25 नगरसेवकांचा शिंदे गटाला पांठिबा, पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा सैनिकांचाही समावेश…

vishwatmaklokswamivarta

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

vishwatmaklokswamivarta

शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठयांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta