vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

 

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दि.15 जुलै पासुन दर सोमवार व शुक्रवारला सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

बुलडाणा विभागातील प्रत्येक आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. चिखली आगार येथे शुक्रवार दि. 17 जानेवारी, खामगाव आकार येथे सोमवार दि. 20 जानेवारी, मेहकर येथे शुक्रवार, दि. 24 जानेवारी, मलकापूर येथे सोमवार, दि. 27 जानेवारी, जळगांव जामोद येथे शुक्रवार, दि. 31 जानेवारी व शेगांव येथे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

डीपी बोले तो.. डेमोक्रसी पार्टिसिपेशन” उपक्रम प्रशंसनीय – निवडणूक निरीक्षक जीवनेस्वीप समितीच्या ‘डीपी, स्टेटस व रिंगटोन’ उपक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी-शिवजयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..

vishwatmaklokswamivarta

यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य..

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश