vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

सतीश घाटगे पाटलांनी पूर्ण केला शहागडच्या जनतेला दिलेला शब्द–बस स्थानक परिसरात उभारले सुसज्ज स्वच्छतागृह

——

अंबड प्रतिनिधी: तालुक्यातील शहागड येथील बस स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. स्वच्छतागृहाअभावी महिला प्रवाशासंह स्थानिक नागरिकांची कुचुंबना होत होती. हा प्रश्न सोडविण्याचा शब्द समृद्धी शुगर्सचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिला होता. त्यानुसार या ठिकाणी १० लक्ष रुपयांचा निधी मिळवून देत सुसज्ज अशा स्वच्छतागृहाची निर्मिती त्यांनी केली. प्रवाशांसह येथील व्यापाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शहागडच्या जनतेने सतीश घाटगे यांचे आभार मानले.

गेल्या अनेक वर्षापासून शहागड बस स्थानकातील स्वच्छतागृहाचा प्रश्न चर्चेत होता. परंतु कुणीही हा प्रश्न मार्गी लावू शकले नव्हते. सहा महिन्यापूर्वी शहागड येथील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सतीश घाटगे पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. सतीश घाटगे यांनी हा प्रश्न संवेदनशील पणे समजून घेऊन शहागड बस स्थानक परिसरात सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यासाठी 10 लाखाचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. या निधीतून बस स्थानक परिसरात सुसज्ज असे स्वच्छतागृह तयार झाले. 2 फेब्रुवारी रोजी सतीश घाटगे यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाची लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह खुले करण्यात आले.

सत्ता असो वा नसो जनतेचे प्रश्न सोडवता येते- सतीश घाटग,

 जनतेचे प्रश्न खूप मोठे नाहीत, फक्त ते सोडविण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. निवडणुकीत पराभव झाला असला तरी माझे राजकारण विकासावर होते आणि यापुढेही राहील. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता असो किंवा नसो प्रश्न सोडवता येतात. माता – भगिनींची स्वच्छतागृहाअभावी होणारी कुचंबना थांबवता आली याचे समाधान आहे. हे काम करून मी शहागडच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

२५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत छत्तीसगड राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न!येत्या विधानसभेत लवकरच कठोर धर्मांतरविरोधी कायदा लागू करू ! – छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

लातूर जिल्हा पूरस्थिती व अतिवृष्टी बचावकार्य संदर्भात माहिती

vishwatmaklokswamivarta