vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमीत्त देशभरातील शिवप्रेमी जनतेला सर्व भारतीयांना शिव जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज हे मूर्तिमंत शौर्य होते.त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे आदर्श शिवशाही सुराज्य होते.त्यांचे या देशासाठी युगप्रवर्तक योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपले काय झाले असते हे सांगता येत नाही.या देशात मुघलांनी थैमान घातले असते.मुघलांची अन्यायकारक मोघलाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य गाजवून नष्ट केली त्यांचा आम्हाला अभिमान आहे.त्यांनी गनिमी काव्याने केलेले युद्ध जगात आश्चर्य ठरले आहे.त्यांच्या राज्यात महिलांवर जर कोणी अत्याचार केला तर त्यांचे हातपाय तोडून त्यांचा कडेलोट केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते.दलित जनता ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानते असे सांगत सर्व शिवप्रेमी जनतेला ना.रामदास आठवले यांनी शिवजयंती च्या शुभेच्छा दिल्या

आहेत0000

संबंधित पोस्ट

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जेईई/नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची खात्री करण्याचे आवाहन

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..