vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शाश्वत सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात खाम नदी पुनरुज्जीवनासह आरोग्य, जलसंधारण व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांना नुकतेच (दि.१८) प्रवीण अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पर्यावरणीय स्थिरता, सुलभ आरोग्यसेवा आणि धोरणात्मक भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांमुळे भविष्य-सज्ज शिक्षण वाढवण्याची बांधिलकी अधोरेखित केली.

स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एसटीएल) चे उपाध्यक्ष अग्रवाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होत असलेल्या उपक्रमांना भेट दिली. यात खाम नदी संवर्धन प्रकल्पाची पाहणी त्यांनी केली. टोणगाव येथे आरोग्य सेवा उपक्रम, मोबाइल आरोग्य युनिट्स आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय हस्तक्षेपसेवा, टेलिमेडिसिन आणि जलद निदानांचा लाभ देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कुंभेफळ रोबोटेक्स इंडियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या रोबोएज कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. एआय, कोडिंग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण दिले जाते.

  या उपक्रमांनी जिल्ह्यात परिवर्तन घडवून आणले आहे. पर्यावरण संवर्धनात, उपक्रमांमुळे ४ लाखांहून अधिक वृक्षारोपण झाले आहे, ९५ हून अधिक जल संरचनांची निर्मिती झाली आहे आणि २.६९ दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत झाली आहे, ज्यामुळे ५६ गावांतील लोकांना फायदा झाला आहे. आरोग्यसेवेत, स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमामुळे २.५ दशलक्षाहून अधिक लोकांवर परिणाम झाला आहे, ज्यामध्ये ४८% महिला लाभार्थी आहेत, आजारपणात २९% घट झाली आहे आणि ७०% रुग्णांना मोफत औषधे मिळाली आहेत. शिक्षणामध्ये, एसटीएलने ३०० सरकारी शाळांवर परिणाम केला आहे, ज्यामुळे लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे, तर रोबोएज कार्यक्रमात ११शाळांमधील ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, ज्यापैकी १३ विद्यार्थ्यांनी एस्टोनियामधील रोबोटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

०००००

संबंधित पोस्ट

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करावेत

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी अचानक पुराचा लोंढा वस्तीत घुसल्यानं घरं दुकानं तसंच वाहनांचंही नुकसान झालं. 

बुलढाणा जिल्ह्यात ‘माविम’ ठरतेय महिलांच्या आर्थिक उन्नतीचे इंजिन;४२ हजाराहून अधिक महिला झाल्या आत्मनिर्भर