vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

राज्य प्रतिनिधी-महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात पंतप्रधान जन मन योजनेंतर्गत २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीमार्फत वाडगांव आदिवासी वाडी येथे १९ घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, वाडगांव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियान मार्फत पी.एम. जन मन योजनेंतर्गत घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे‌. शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी या घरकुलांचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीच्या माध्यमातून वाडगांव आदिवासी वाडी येथे १९ घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाडगांव हे स्वच्छ व सुंदर गाव आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १०० टक्के कर वसुली करणारी वाडगांव ग्रामपंचायत आहे. गावातील उर्वरित घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. गावात कुणी निरक्षर लोक असतील तर त्यांच्यासाठी वर्ग सुरू करून वाडगांव १०० टक्के साक्षर करू या. तसेच गावातील लोकांना सर्व योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने काम करुन, येथील आदिवासी वाडीचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.: किशन जावळे जिल्हाधिकारी, रायगड पी.एम. जन मन योजनेंतर्गत जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत आहे. महिलांच्या हस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे भूमिपूजन करण्याचा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम ठरेल. सर्व घरकुलांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच वाडगांव आदिवासी वाडीवरील १९ घरकुलांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.:डॉ. भरत बास्टेवाड

संबंधित पोस्ट

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर.

नव्या मुंबईतील ऐरोली काटई नाका एलिव्हेटेड रोडवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी 25, 26 डिसेंबरच्या मध्यरात्री होणार वाहतूक कोंडी

vishwatmaklokswamivarta

जय भवानी, जय शिवाजी”एक घोषणा…आणि शिवसेना-भाजप कार्यकर्ते शांततेने परतले…

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी  प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 21 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta