छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी हे आदेश निर्गमित केले असून दि.२४ मार्चपर्यंत हे आदेश अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे