vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

नवी मुंबई प्रतिनिधी: कोकण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री होत असते. सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र कोकण विभागचे शिवाजी काकडे, यांच्या सूचनेवरून नूकतिच कारवाई करण्यात आली.

तसेच ठाणे जिल्हयातील कल्याण व ठाणे, पालघर जिल्हयातील वसई, रायगड जिल्हयातील पनवेल व कर्जत, रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुडाळ या रेल्वे स्टेशनवर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी देवून नूकतिच कारवाई करण्यात आली. वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये तपासणी केली.

रेल्वे स्टेशनवरील चहा विक्री करणाऱ्या आस्थापनांना १५०/१८० मिली एवढी घोषित प्रमाण असताना तपासणीमध्ये ३० ते ८० मिली एव्हढा चहा कमी देत असल्याचे आढळून आले. अश्या एकूण ७ आस्थापनांवर वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये प्रकरण दाखल करण्यात आले. वापरात असलेली तोलन उपकरणे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्यामुळे ०४ प्रकरणे दाखल करण्यात आली. चिपळूण व रत्नागिरी स्टेशन वरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतूदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामूळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पत्रकान्वय कोकण विभागाचे सह नियंत्रक,वैध मापन शास्त्राचे शिवाजी काकडे यांनी दिली.

0000000000000

संबंधित पोस्ट

दशसूत्री’ची प्रेरणाः वैष्णवीला आधार कृत्रिम पायाचा-दिव्यांग विद्यार्थिनीच्या सक्षमतेसाठी एकवटली शाळा अन गाव…

vishwatmaklokswamivarta

शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई;वाडीबंदर परिसरातून ४५१ सिलिंडरसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न;शासकीय योजना व सुविधेचा लाभ जेष्ठानी घ्यावा- जिल्हाधिकारी..

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

अवयवदान’ ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta