vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान;मूल्यसाखळी भागीदार होण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले..

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान;मूल्यसाखळी भागीदार होण्यासाठी इच्छुक संस्थांकडून अर्ज मागविले..

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत सोयाबीन व भुईमुग या पिकासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. या योजनेंतर्गत पिकनिहाय मुल्यासाखळी भागीदार यांच्यामार्फत संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात समूहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा इ. घटक राबवायचे आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी ,सहकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्रता निकष :१. कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी.

२. ज्या जिल्ह्यात समूह तयार झाला आहे तेथे काम करण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा. म्हणजेच नोंदणी माहे मार्च, २०२२ पूर्वीची असावी.३. किमान २०० शेतकरी, उत्पादक कंपनी (FPC) मध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये नोंदणीकृत असावेत.४. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमूद असावे.५. मागील ३ वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयापेक्षा जास्त असावी.६. शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) मध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा सहभाग असावा.७. शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यामध्ये कार्यरत असावी.८. सरकारकडून अनुदान प्राप्तकर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल.

शेतकरी उत्पादक संघ (FPOs) योजनेंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), NAFED, NSC-OS इ. सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबियाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs) यांना पात्रता निकष पूर्ततेच्या आधारे निवड केली जाईल. इच्छुक शेतकरी कंपन्या, संस्थांनी पुष्ट्यर्थ कागदपत्रांच्या आधारे अर्ज करावा व सोमवार दि.५ रोजी सकाळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना,राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ [बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश]

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित-· बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;· प्रकल्प पुर्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे विशेष प्रयत्न..

vishwatmaklokswamivarta