vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर

*प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर

 रायगड ( प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 झारखंडच्या खुंटी गावातून जनजाती गौरव दिनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची सुरुवात केली आहॆ. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रकल्प अधिकारी आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार हर्षिता भटनागर यांन आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर म्हणाल्या की, आदिम आदिवासी गटांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या अभियानाचे 3 वर्षाचे नियोजन आहे. याकरिता 11 प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. आणि संबंधित 9 मंत्रालये प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरापासून तळागाळापर्यंत एकीकृत केली आहे. राष्ट्रीय स्तरावर या मिशनासाठी रु.24000 कोटींची तरतूद आहे. यावेळी त्यांनी सुरु प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या काजकाजाचा आढावा उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला.

 यावेळी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियाची माहिती उपस्थितांना दिली.

०००००

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश

दसरा मेळावा मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ते पहा…

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta