vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर

*प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी- प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर

 रायगड ( प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 झारखंडच्या खुंटी गावातून जनजाती गौरव दिनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची सुरुवात केली आहॆ. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रकल्प अधिकारी आदिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार हर्षिता भटनागर यांन आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प अधिकारी हर्षिता भटनागर म्हणाल्या की, आदिम आदिवासी गटांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या अभियानाचे 3 वर्षाचे नियोजन आहे. याकरिता 11 प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. आणि संबंधित 9 मंत्रालये प्रशासनाच्या सर्वोच्च स्तरापासून तळागाळापर्यंत एकीकृत केली आहे. राष्ट्रीय स्तरावर या मिशनासाठी रु.24000 कोटींची तरतूद आहे. यावेळी त्यांनी सुरु प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या काजकाजाचा आढावा उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला.

 यावेळी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण तेजस्विनी गलांडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियाची माहिती उपस्थितांना दिली.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी पक्की घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

रब्बी हंगाम 2025-26 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन1 ते 7 डिसेंबर – 10 वा “पीक विमा सप्ताह”गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; जालना शहरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत