vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे  

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे

— राज्य प्रतिनिधी-घनसावंगी: शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या समृद्धी साखर कारखान्याने यंदाही उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (दि. २६) केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला देण्यात समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात आघाडीवर राहत आला आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी कारखान्याने गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये देखील समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या उसाला उच्चांकी दिला आहे.

आता गाळप गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन भाव देण्याची घोषणा केली आहे. पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दिल्यानंतर लगेच दुसरा हप्ता 200 रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात येणारी असल्याची माहिती समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम वाटप झाल्यांनतर तिसरा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये थेट २९७० रुपये प्रति मे. टन दराने एफआरपीची घोषणा करत समृद्धी कारखान्याने पुन्हा एकदा ‘उस दर युद्धात’ बाजी मारली असून दोन हंगामांप्रमाणेच यंदाही इतर कारखान्यांपेक्षा अधिक दर देत ‘उस दर स्पर्धेत’ आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

————–

प्रतिक्रिया,लवकरच 200 रुपये प्रति मे. टन प्रमाणे दुसरा हप्ता जमा करणार -समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविल्या जातो. याचा आम्हाला अभिमान आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्येही शेतकऱ्यांच्या उसाला 2970 रुपये प्रती मे. टन दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे.पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे अदा केला आहे. लवकरच 200 रुपये प्रति मे. टन प्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.  -सतीश घाटगे, चेअरमन समृद्धी साखर कारखाना

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश**मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक*

आज ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबरला विष्णुदास भावे नाटयगृहात होणार पारितोषिक वितरण.

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहिता योग्यच!पंतप्रधानही वस्त्रसंहितेचे पालन करतात; सरकारीकरण झालेल्या सर्वच मंदिरात वस्त्रसांहिता लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta

अदानी युवा सेवा फाउंडेशन धारावीचे आपले सहकारी मित्र विनोद गोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासी शुभेच्छा भेट