vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, प्रतिनिधी: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवावा याबाबतची कार्यवाही विभागाने जलदगतीने करावी, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.मंत्रालयात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार मनीषा चौधरी, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य विनायक काशीद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ.वाय.सी.साळे, डॉ.एस.एस.नारखेडे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन करण्याबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. सध्या पालघर येथे एकही शासकीय कृषी महाविद्यालय नाही तसेच महाविद्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. येथील जनतेची मागणी लक्षात घेता याबाबत कृषी विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*******

संबंधित पोस्ट

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ निमित्त नवी मुंबईत सखोल स्वच्छता मोहीमा…

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या शालांत परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका 23 माध्यमिक शाळांचा निकाल 94.72 टक्के**अंशिका यादव 95 टक्के गुण संपादन करीत नमुंमपा शाळांमध्ये सर्वप्रथम*

राज्यात ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’ मोहीम राबविणार- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

 सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा