vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

            सांगली, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 6 मे 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 करिता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण दिनांक 18 जून 2025 पासून सुरू करण्यात आले आहे. नागरिक सर्वेक्षणाचा कालावधी 18 जून ते 17 जुलै 2025 असा आाहे. विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यात नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग घ्यावा, असे आवाहन शासनाच्या नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे.

            विकसित भारतच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र 2047 साठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत आहे. नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी नागरिक सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात 7 सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. सर्वेक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यांच्या समस्या, शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन, त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र 2047 करिता नागरिक https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीच्या दक्षता विभागाचा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर रायगडमधील गार्गी हुट्टेनेस अल्बर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगार प्रश्नांबाबत बैठक

जालन्यात 4 मार्चपासून वॉटरशेड यात्रा4 गावामध्ये विविध कार्यम्रम व उपक्रमांचे आयोजन..

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन

भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट आरोपीविरोधात फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवणार; नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री