vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल व्यावसायिकांचा कर वाढीविरोधात संप…

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कर आणि विविध शुल्कांमध्ये वाढ केली आहे. या वाढीचा तीव्र निषेध म्हणून राज्यभरातील हॉटेल व्यावसायिकांनी आज चौदा जुलै रोजी एकदिवसीय ‘हॉटेल बंद’ आंदोलन पुकारले आहे. या दिवशी हॉटेल, खानावळी, रेस्टॉरंट्स, टिफिन सेवा आणि होम डिलिव्हरी बंद राहणार असल्याचे संघटनांनी जाहीर केले आहे.

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, महाराष्ट्र हॉटेल असोसिएशन आणि स्थानिक संघटनांनी एकत्र येत हा बंद पुकारला आहे. त्यांचा आरोप आहे की शासनाने कर, वीजदर, पाणीपट्टी, परवाना शुल्क आणि इतर सेवा शुल्कात मोठी वाढ केली असून, त्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. विशेषतः छोटे आणि मध्यम हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.संघटनांनी सांगितले की, वारंवार चर्चा करूनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी हा बंद शांततेत पुकारण्यात येत आहे. हा बंद नागरिकांना त्रास देण्यासाठी नसून, हक्काच्या मागण्यांसाठी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज राज्यभरातील शहरी व ग्रामीण भागांतील हजारो हॉटेल्स आणि खानावळी बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी त्या दिवशीची भोजन व्यवस्था पूर्वनियोजनाने करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. काही पर्यटन स्थळांवरील खाद्यसेवांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे

.000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

आपण करत असलेले काम ही देशसेवा – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘एचएएल’च्या तंत्रज्ञांचे राज्यपालांकडून कौतुक

उर्स सोहळ्याचे पावित्र्य व भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबई त पावसाचा इफेक्ट -ठाणे ते मुंबई CST सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta