vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तंभ बनवा-विकासकुमार बागडी

जालना/प्रतिनिधी

जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांची कामाची प्रसिध्दी करणारे चौथा स्तभ म्हणजेच पत्रकारितेच्या नावे कुठेही आणि कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो चांगलाच आहे. शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम, अबुल हसन, राजेंद्र तिरुखे, लक्ष्मीनारायण पिपरिये, लक्ष्मीनारायण गौड, सुरेंद्र जैस्वाल, रतनलाल कुरिल, चंद्रकांत शहाणे, अनिल खंदारे आदी अनेक पत्रकार असे आहेत की, त्यांनी आपले संपूर्ण जीवन पत्रकारितेला वाहिले, परंतू त्यांच्या नावाने शहरात एखादाही स्तंभ असू नये, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. म्हणूनच या सर्व दिवंगत पत्रकारांची आठवण म्हणून तरी जालना शहर महानगर पालिकेने एखादा स्तंभ शहरात उभारावा, अशी विनंतीही व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

मित्र’चा पुढाकारः१९ रोजी विकास परिषदेत विचारमंथन;तज्ज्ञ व्यक्ति तयार करणार जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’

vishwatmaklokswamivarta

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी”बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” तत्त्वावर

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात दोन खासगी बसचा भीषण अपघात, 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 25 ते 30 जण जखमी

वारीस पंजाब दे’चा  प्रमुख खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंगला   अटकआसामच्या दिब्रुगड तुरुंगात हलवण्यात येणार आहे

vishwatmaklokswamivarta