vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड ( प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कळविले आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

तरी दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल तातडीने सादर करावा- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,राज्यातील पुल, साकव आणि सार्वजनिक इमारतींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन;महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थांची गरज- ना. चंद्रशेखर बावनकुळे

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम;प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी“प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

समाजसेविका कल्पना शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या तालुक्याच्या वतीने सन्मान