विदर्भात येत्या काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पिवळा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागांमध्ये ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि दमदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
दरम्यान, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातही काही भागांत पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत मात्र पावसाची शक्यता अत्यल्प आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामामध्ये योग्य ती काळजी घ्यावी, तसेच नागरिकांनी देखील गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.