अध्यात्मिक वार्ता-आज आठ ऑगस्ट 20 25 महिना आषाढ महिन्यात समुद्र खवळलेला असतो त्यानंतर श्रावण पौर्णिमेच्या सुमारास तो शांत होतो यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मच्छीमार बांधव सोन्याचा प्रतीकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात
श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक सणांची सुरुवात होते. नागपंचमीनंतर येणारा दुसरा सण अर्थात नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. नारळी पौर्णिमेच्या सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते.
यंदा नारळी पौर्णिमा ही8ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. नारळी पौर्णिमा हा सण रक्षाबंधनाच्या दिवशी साजरा केला जातो. भद्राचं सावट असल्यामुळे रक्षाबंधन ही 9ऑगस्टला जाईल. या दिवशी कोळी बांधव समुद्राची मनोभावे व विधीवत पूजा करतात. हा सण अगदी धूमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करुन नारळ अर्पण करतात. या दिवसानंतर वाऱ्याचा जोर व दिशा बदलण्यासाठी कोळी बांधव समुद्र देवतेला आवाहन करतात.
(आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा.आषाढ महिन्यात समुद्र खवळलेला असतो त्यानंतर श्रावण पौर्णिमेच्या सुमारास तो शांत होतो यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मच्छीमार बांधव सोन्याचा प्रतीकात्मक नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करतात.)