vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

सातारा प्रतिनिधी- कोयना धरणासह धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी,तारळी व वीर या प्रमुख धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित निवारा शेड, हायस्कूल, शाळा, काहींना नातेंवाईकांकडे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.  यामध्ये पाटण तालुक्यात पाटण शहरात 13 कुटुंबातील 45 नागरिकांना, हेळवाक येथील 5 कुटुंबातील 17 नागरिकांना,

नावडी, औंध वस्ती येथील 7 कुटुंबातील 15 नागरिकांना, कराड तालुक्यातील कराड शहर, पत्राचाळ, पाटण कॉलनी, कोयना दूध कॉलनी, रुक्मीणीनगर येथील 6 कुटुंबातील 24 नागरिकांना, महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बु. येथील 8 कुटुंबातील 18 नागरिकांना, वाई शहरातील 40 कुटुंबातील 135 नागरिकांना, सातारा तालुक्यातील भैरवगड येथील 30 कुटुंबातील 65 नागरिकांना,मोरेवाडी येथील 20 कुटुंबातील 42 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

रस्त्यावर पाणी आल्याने तात्पुरते बंद करण्यात आलेल्या 20 ऑगस्ट रोजी रस्त्यांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहेत. पाटण तालुक्यात नेरळे पूल व मुळगाव पूल, पाबळनपाला रस्ता खचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कराड- हेळवाक रस्त्यावर पाणी आल्याने बंद., महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे-मजरेवाडी रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला आहे. वाई तालुक्यातील कृष्णा नदीवरील हमदाबाज-किडगाव पूल, करंज-म्हसवे पूल, मौजे जिहे येथील जिहे-कठापूर रोडवरील पुलावरुन पाणी वाहत असलेने रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्यातील नीरा नदीवरील लोणंद (वाठार)-वीर रस्ता व नीरा नदीवरील जून पाडेगाव येथील रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद रस्त्यांमुळे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल “मॅग्नेट“ची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

दिशा समितीच्या बैठकीत जलजीवन मिशन, महावितरण, रस्ते विकासासह विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा व सूचना

vishwatmaklokswamivarta

सावत्र आईकडून मारहाण होत असलेल्या बालिकेची सुटका; चाईल्ड हेल्प लाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा