vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

रायगड, प्रतिनिधी :जिल्ह्यात दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कडक आदेश जारी केला आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचा संपूर्ण तपशील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवणे बंधनकारक असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. वाहन दुरुस्तीची दुकाने, लहान गॅरेज तसेच खासगी व्यापाऱ्यांकडून मोटारसायकली व इतर वाहने विक्रीस येत असतात. परंतु या व्यवहाराचा सविस्तर तपशील न ठेवला गेल्याने चोरीच्या वाहनांची देवाणघेवाण वाढत आहे. देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये चोरीच्या मोटारसायकलींचा वापर झाल्याची उदाहरणे नोंदली गेली आहेत. गंभीर गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांना वाहनांच्या मालकांचा व खरेदीदारांचा तपशील उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येतात.

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रत्येक सात दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला व्यवहाराचा तपशील द्यावा. या तपशिलात वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, मूळ मालकाचे नाव, कायमचा व सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, आरसीटीसी बुक यांचा समावेश असणे बंधनकारक राहील. खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्राची माहिती देणे देखील आवश्यक असेल.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यात दंड तसेच इतर शिक्षेची तरतूद आहे

हा निर्णय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने घेतला असून त्यामुळे जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

००००

संबंधित पोस्ट

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..

कृषीप्रधान भारतासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल- कृषी क्षेत्रातील क्रांतीसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रभावी शस्त्र;    चॅटजीपीटी म्हणजे एआय नव्हे – सीईओ आनंद माहुरकर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

vishwatmaklokswamivarta

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लिखित द इंडिया वे पुस्तकाचं मराठीत प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta