vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

सातारा, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४ हजार ५००, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये ६००, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह रुपये २००, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत.

0000

संबंधित पोस्ट

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच– उद्योग मंत्री उदय सामंत

स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta