vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

जालना, प्रतिनिधी :- आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव करण्याबाबतची योजना नव्याने सुरु करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतूदीनुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने अर्ज सादर करण्याचा अंतिम 24 नोव्हेंबर 2025 असा निश्चित करण्यात आला आहे. तरी आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍ती अथवा वारस पत्‍नी, पतीने आपला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती दि. 02/01/2018 पुर्वी हयात नसल्यास त्‍यांच्‍या हयात जोडीदार पती, पत्नी केवळ अशा व्यक्तींनी अनुज्ञेय असलेले मानधन मिळण्‍याकरीता दि. 25सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुभा दि.27/06/2025 च्या शासन शासन निर्णयान्‍वये देण्यात आली होती. त्‍यानुसार अशा आणीबाणीधारकांच्या जोडीदारांनाही (पती/पत्नी) यांनी दि.27/06/2025 च्‍या शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांची अर्ज दाखल करण्याची मुभा राहील. तरी पात्र आणीबाणीधारकांनी विहित मुदतीत जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना येथे अर्ज सादर करावेत. मीसा/डी.आय. आर (आणीबाणी) खाली राजनैतिक अथवा सामाजिक कारणासाठी अटक झालेल्या संबधीत जिल्हा पोलीस अधिक्षक/कारागृह अधिक्षक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावेत. असे अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा शासन निर्णय निर्गमीत झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत राहील. कोणत्याही परिस्थितीत दि.24 नोव्हेंबर 2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. याची आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेली व्‍यक्‍ती अथवा वारस पत्‍नी, पती यांनी नोंद घ्‍यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.

संबंधित पोस्ट

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन  • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास        आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स

खेळाडूंच्या जडणघडणीसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ७५ व्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह,माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे यांना निवेदन

नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भातील धोरण करणार- मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta