vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

परतूर ( प्रतिनिधी :– परतूर येथील आदिवासी आश्रमशाळेत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम मेरा युवा भारत, जालना व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रम हे प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

         कार्यक्रमाला आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या परतूर तालुका समन्वयक अमृता ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. प्रमुख मुख्याध्यापक श्री. एस. बी. जाधव यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मुसळे सर तसेच अधीक्षिका श्रीमती पल्लवी अनकर यांचे विशेष योगदान लाभले.

         सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थिनींना अमृता ठाकूर यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. या सत्रामध्ये मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मासिक पाळी स्वच्छता, पोषण, मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढविण्याविषयी संवाद साधला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलींनी रंगीबेरंगी व आकर्षक रांगोळ्या काढून आपली कलात्मकता आणि सर्जनशीलता सादर केली.  कार्यक्रमाला आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित पाहुण्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

संबंधित पोस्ट

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम दि.१० पासून

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आयोजित पूर्वांचल महोत्सव माटी ९ या महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जम्मू-काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मान्यवर उपस्थित होते

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन