vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात-महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात-महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

रायगड- अलिबाग प्रतिनिधी:- केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायतीमार्फत होते. ग्रामपंचायत नसेल तर कुठलीही योजना प्रभावीपणे अंमलात येऊ शकत नाही, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

    रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ क्षत्रीय समाज सभागृह, कुरूळ येथे उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

     यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्श मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.    महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, “ग्रामसभा म्हटली की, गावकरी हजेरी लावतात, कारण त्यांना माहीत असते की, गावाच्या समस्या सोडविणारा खरा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याचे शिल्पकार म्हणजे ग्रामसेवक. मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकाचे काम अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव होणे,ही जबाबदारी अधिक वाढविणारी बाब आहे.

     यावेळी आमदार महेंद्र दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनीही आपल्या मनोगत व्यक्त केले.     कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना “आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते वाडगाव येथे वन विभागामार्फत आयोजित माझे वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta