vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

                    अमरावती, प्रतिनिधी: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार (MahaVISTAAR-AI)’ हे आधुनिक मोबाईल अॅप विकसित केले असून, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती व विकासासंदर्भात तांत्रिक सल्ला, हवामान अंदाज आदी बाबतची माहिती या ॲपव्दारे सुलभरित्या उपलब्ध होते. यानुषंगाने शेतकरी बंधुनी महाविस्तार (Mahavistaar AI’) मोबाईल ॲपचा वापर करावे. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या अपद्वारे पिकांसंबंधी तांत्रिक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृदा आरोग्यपत्रिका, खतमात्रा गणक, किड व रोग ओळख व त्यांचे व्यवस्थापन, शेती मालाचे बाजारभाव तसेच विविध कृषी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. स्थानिक शेतीविषयक माहितीही या अपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

                        महाडीबीटी प्लॅटफॉर्मला महाविस्तार अॅपशी जोडण्यात आले असून भविष्यात कृषी विभागाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे एकच अॅप वापरावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे मोबाईल अॅप डाउनलोड करून वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे कृषी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

अॅपमधील विविध सेवा, सुविधा, चॅटबॉटचा वापर वाढावा आणि ‘महाविस्तार’ अॅपचा विस्तार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचावा यासाठी ‘महाविस्तार’ मोबाईल ॲप डाऊनलोड करुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी वापर करावे. असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

vishwatmaklokswamivarta

शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री ना. संजय राठोड ‘यवतमाळ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta