vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

भालीवडी कन्या आश्रमशाळेत जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा

रायगड–अलिबाग, प्रतिनिधी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भालीवडी (ता. कर्जत) येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत जिल्हास्तरीय जनजाती गौरव दिवस कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी समाजासाठीच्या संदेशाचे प्रक्षेपणही करण्यात आले.

जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून प्रकल्पामार्फत सात नवीन बहुउद्देशीय केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. रोहा तालुक्यातील लांढर आदिवासी वाडी येथील केंद्राचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते झाले. या केंद्रांद्वारे आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक सक्षमीकरण व शासकीय योजना गावागावात पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आश्रमशाळेतील विविध स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आदिवासी नृत्य, गीत आणि संस्कृतिक कला सादर केले.

MPSC परीक्षेत यश मिळवून रायगडचा गौरव वाढविणाऱ्या नयन वाघ यांचा जिल्हाधिकारी जावळे व प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या गावी सुरू असलेल्या पोलीस भरती अकॅडमीसाठी 10 स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे संच प्रदान करण्यात आले.

००००

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासहविविध पुरस्कारासाठी ग्रंथालयांनी अर्ज सादर करावेत..

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार कराल तर होईल गुन्हा दाखल विद्यार्थी, पालक,शिक्षकआणि नागरिकांना इशारा -जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

vishwatmaklokswamivarta

प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात काँग्रेस प्रणित रिक्षा युनियन स्थापना

vishwatmaklokswamivarta

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार