vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी प्रा.श्रीरंजन आवटे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी प्रा.श्रीरंजन आवटे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते प्रा.श्रीरंजन आवटे यांनी ‘नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले संविधानातील मूलभूत हक्क’ या विषयावरील उद् बोधक व्याख्यानातून ‘भारतीय संविधानाचा आत्मा’ म्हणून बाबासाहेबांनी संबोधलेल्या संविधानातील 22 विभागांपैकी तिसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील कलम 12 ते 35 उलगडून सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले बाबासाहेबांचे अप्रतिम स्मारक पाहून मी भारावून गेलो असे सांगत प्रा. श्रीरंजन आवटे यांनी स्मारकातील विविध दालनांना भेटी देताना टाईम मशीनमध्ये बसून बाबासाहेबांसोबत चालतोय असा अनुभव आल्याचे कथन केले. शिक्षण विभागाच्या उपायुक्त तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रमुख श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी महानगरपालिकेच्या वतीने व्याख्यात्यांचे स्वागत केले. याप्रसंगी स्मारकाच्या सल्लागार श्रीम. संध्या अंबादे उपस्थित होत्या.

    आपल्या व्याख्यानामध्ये प्रा.श्रीरंजन आवटे यांनी संविधानाची निर्मिती ही तीन ते चार वर्षात झाली असली तरी त्या पाठीमागे 150 हून अधिक वर्षांची परंपरा असल्याचे सांगत, संविधानात अशी चिरंतन मूल्ये आहेत जी पुसता येणार नाहीत असे मत व्यक्त केले. ‘उद्देशिका ही संविधानाचे ओळखपत्र’ या नाना पालखीवाला यांच्या विधानाचा उल्लेख करीत ‘समाजाचा जीपीएस स्वप्न नकाशा’ म्हणजे संविधान असा वेगळा विचार त्यांनी मांडला. उद्देशिका समजली की भारतीय संविधानाचे व्याकरण समजते असे सांगताना भारतातील लोकांनी स्वतःला हे संविधान अर्पण केले आहे त्यामुळे लोकांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले.

    काय नाकारायचे हे बाबासाहेबांनी सांगितलेच त्यासोबतच काय स्वीकारायचे हे पण त्यांनी सांगितले. विषमतेला नकार व समतेला होकार हे बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेत नाही म्हणून पुन्हा पुन्हा संविधान समजून घेण्याची गरज भासते असे मत प्रा.श्रीरंजन आवटे यांनी व्यक्त केले

    इतिहासातील विविध दाखले देत, संविधानातील मूल्यांची वेगवेगळ्या उदाहरणांतून मांडणी करत संविधानातील विविध कलमांच्या पाठांतरापेक्षा त्या पाठीमागचा आशय समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने संविधानातील मूलभूत हक्काविषयी 12 ते 35 कलमांच्या माहितीची उदाहरणासहित मांडणी त्यांनी केली. संविधानाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आज व्याख्यानातून मिळाला अशी प्रतिक्रिया याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांनी दिली

0000

संबंधित पोस्ट

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन-हुतात्मादिन- २१नोव्हेंबर 

vishwatmaklokswamivarta

दशसूत्री’ची प्रेरणाः वैष्णवीला आधार कृत्रिम पायाचा-दिव्यांग विद्यार्थिनीच्या सक्षमतेसाठी एकवटली शाळा अन गाव…

vishwatmaklokswamivarta

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta