vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

जालना, (प्रतिनिधी)- भारतीय कामगार सेना व महिको कंपनीच्या गोकुळवाडी, मांडवा, घाणेवाडी, डेअरी, जालना, दावलवाडी, हातवण, पिंपळगाव,बोरखेडी, सिंधीकाळेगाव आदी फॉर्मवर काम करणार्‍या मुनिम, ड्रायव्हर,सालदार, महिनदार आदी कामगारांच्या वतीने ११ वा ऐतिहासिक मासिक पगारवाढीचा करार आज करण्यात आला. कामगारांनी फटाके फोडून, गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून कराराचे स्वागत केले आहे.करारानुसार कामगारांना वर्षातून दोन युनिफॉर्म सिलाईसह, शुज, रेणकोट,स्वेटर, बारा महिन्यात ३६ सुट्या, घर बांधणीसाठी कर्ज, दिवाळी करिता १५हजार रुपये अ‍ॅडव्हांस, २० टक्के बोनस, ग्रज्युटी, अत्यावश्यक कामाकारिताएमर्जन्सी लोन, यासह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ या करारामुळे,कामगारांना मिळणार आहे. करार करण्यासाठी महिको कंपनीच्या वतीने उपाध्यक्

अजय वैद्य, सलिल भिडे, महेंद्र चव्हाण, दिपक दरक, विनय नखाते, राजेंद्र बनकर तर भारतीय कामगार सेनेच्या वतीने विभागीय संयुक्त चिटणीस प्रभाकर मते, जिल्हाध्यक्ष जनार्धन रेगुडे, युनिटचे पदाधिकारी मदन म्हस्के,दादाराव कावले, विठ्ठल चंद, महेबुबखाँ पठाण आदी उपस्थित होते.

०००००००

फोटो ओळी…..

४- भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक

करार झाला असून कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ झाल्याचा करार करण्यात आला

संबंधित पोस्ट

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

vishwatmaklokswamivarta

वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.

vishwatmaklokswamivarta

संतसाहित्य हाच जीवनाचा आधार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.जिल्हा न्यायालय ; तालुका न्यायालयांमध्ये होणार आयोजन 

vishwatmaklokswamivarta