
अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली
लातूर, प्रतिनिधी : चाकूर- किणी यल्लादेवी-वाढोणा बु.-गव्हाण ते जिल्हा सरहद्द रा.मा. २६८ रस्त्यावर अतनुर गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरता वळण रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तिरू नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद पडू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उदगीर-घोणसी-कोळनूर-अतनुर-गव्हाण आणि अतनुर-कोळनूर-जळकोट/उदगीर या मार्गावर वळविण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
*****



