vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन  

बालविवाह निर्मुलनासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन

        जालना, प्रतिनिधी:- शासनाकडून बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले असून हे सर्व नागरिकांसाठी खुले आहे. तरी बालविवाह मुक्त भारत पोर्टलवर जाऊन https://stopchildmarriage.wcd.gov.in या लिंकवर क्लिक करुन बालविवाह निर्मुलनाची प्रतिज्ञा घ्यावी व प्रतिज्ञा घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी.एम. यांनी केले आहे.

जिल्ह्यात दि.16 ऑक्टोबर 2025 ते दि.26 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान 100 दिवस जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडुन राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात बालविवाहाचे समुळ उच्चाटन व्हावे या अनुषंगाने प्रशासनाकडुन जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह थांबविण्याकरीता 24 तास 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सेवा सुरु आहे. तसेच प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकांनी देखील बालक, बालिका यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य तसेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्व स्तरावरुन सर्वांनी बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणुन बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरु करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाख  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जखमींची विचारपूस करून दिला धीर

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.