vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती : अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू

मुंबई : प्रतिनिधी आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या संपर्कात राज्य शासन असून त्यांच्या मदतीसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत

तसेच केंद्र सरकारसोबतही समन्वय ठेवून आवश्यक ती मदत व सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित दूतावास, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि इतर यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या संपूर्ण समन्वय कार्यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्र शासनाला सर्वतोपरी मदत केली जात असून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने मदतीसाठी एक विशेष व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे. आखाती देशांमध्ये अडचणीत असलेल्या किंवा मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांनी व्हॉटसॲप क्रमांकाद्वारे : +97150 365 4357 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील धारावीत विशेष लसीकरण मोहिम, कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश, तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, लसीकरण मोहीमेला गती.

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे ‘आझाद’ला NDA मध्ये येण्याचे निमंत्रण, म्हणाले – गुलाब नबी आझाद यांन काँग्रेस सोडल्यानंतर ‘आझादी’ मिळाली

सणासुदीच्या काळात केंद्राकडून एक आगाऊ हप्ता म्हणून महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार

सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीचीआरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी– मंत्री उदय सामंत