vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती अचूक भरून अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करावा. तसेच Send Back झालेले अर्ज वेळेत दुरुस्त करून पुन्हा सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे पण अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी ती १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करावीत.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई § डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात..

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चे उद्घाटन जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे

vishwatmaklokswamivarta