vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत जमा करा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जातील माहिती अचूक भरून अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड करावा. तसेच Send Back झालेले अर्ज वेळेत दुरुस्त करून पुन्हा सादर करावेत.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे पण अर्जाची हार्डकॉपी व आवश्यक कागदपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांनी ती १५ मार्च २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे जमा करावीत.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा, वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत  

vishwatmaklokswamivarta

श्रमिक हो.. घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक