vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

’माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

 

नांदेड प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी आणि निरोगी समाज निर्मितीसाठी ‘माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनानुसार, १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे.

१ एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजनअभियानाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ एप्रिल २०२६ रोजी, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘विशेष आरोग्य ग्रामसभा’ आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ग्रामसभेमध्ये: * ग्रामस्थांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली जाईल. * आरोग्य, स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली जाईल. * लोकसहभागातून गाव ‘आरोग्य संपन्न’ करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाईल.

अभियानाचे स्वरूप व पुरस्कारहे अभियान केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजना आणि शाश्वत विकास ध्येयांशी (SDG-3) संलग्न आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, तालुका आणि जिल्ह्यांना राज्यस्तरावर कोट्यवधी रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

चंदनवाडी शिवसेना शाखेच्या वतीने 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी-केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta