vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

एसएनएल कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरीक्षणासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांना निवेदन

       राज्य प्रतिनिधी   जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मधील कर्मचाऱ्यांच्या मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतन पुनरीक्षणाच्या प्रश्नाबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन सादर केले आहे.

            बीएसएनएल ही देशातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार संस्था असून, ग्रामीण, दुर्गम व वंचित भागांमध्ये दूरसंचार सेवा पोहोचविण्यात तिची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. खासदार डॉ. काळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुमारे ६० हजार बीएसएनएल कर्मचारी मागील जवळपास नऊ वर्षांपासून वेतन पुनरीक्षणापासून वंचित आहेत, ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब आहे.

केंद्र व राज्य शासन तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये नियमित वेतन पुनरीक्षण होत असताना बीएसएनएल कर्मचाऱ्यांवर होत असलेला हा भेदभाव त्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम करत असून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेलाही बाधा निर्माण करत आहे, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.

तसेच, “अफोर्डेबिलिटी क्लॉज” या अटीमुळे वेतन पुनरीक्षणास विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देत, या अटीची पुनर्समीक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीएसएनएल ही केवळ व्यावसायिक संस्था नसून डिजिटल इंडिया, ग्रामीण कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक समावेशनासाठी महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ. काळे यांनी केंद्र सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. या प्रश्नाचा संबंध केवळ वेतनाशी नसून लाखो कुटुंबांच्या जीवनमानाशी आणि भविष्यासोबत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळनवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

vishwatmaklokswamivarta

जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र #चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानपरिषद सभापती सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*