vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवार, दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता काढण्यात येणार आहे. ही सोडत संगणकीय प्रणालीद्वारे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून पात्र विद्यार्थ्यांची निवड याद्वारे करण्यात येईल.

या प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या पालकांना सोडतीचा निकाल अधिकृत आरटीई पोर्टलवर पाहता येणार आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला समान संधी मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. प्रशासनाकडून सोडत प्रक्रिया सुरळीत, विश्वासार्ह व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.”तसेच त्यांनी पालकांना आवाहन केले की, कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा मध्यस्थांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे.

सोडतीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत निश्चित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित जागा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेआरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित महानगरपालिका शिक्षण विभाग / तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

०००

संबंधित पोस्ट

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जल,स्वच्छ मन’ मोहीमेंतर्गत नवी मुंबईत जलाशय व परिसर स्वच्छतेच्या ठिकठिकाणी विशेष मोहीमा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta