vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

समृद्धी महामार्गावरील भीषण अपघात प्रकरणी खासदार डॉ. कल्याण काळे यांची ठोस भूमिका – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, पीडितांना मोठ्या आर्थिक मदतीची मागणी

जालना, प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मौजे कडवंची (ता. जालना) येथे दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी झालेल्या भीषण अपघातात 8 निरपराध महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून 5 कामगार गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून (PMNRF) पीडित कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना किमान ₹20 लाख तर जखमी कामगारांना उपचारासाठी किमान ₹10 लाख आर्थिक सहाय्य तात्काळ देण्याची मागणी केली आहे.

तसेच खासदार डॉ. काळे यांनी मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मा. मुख्य अभियंता यांना स्वतंत्र पत्रे देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम भूमिका मांडली आहे.

आपल्या पत्रांमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही घटना केवळ अपघात नसून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर भारतीय दंड संहितेनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच महामार्गावरील कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी, आवश्यक सेफ्टी किटचा अभाव, तसेच “छोटा हत्ती” वाहनाच्या अनधिकृत प्रवेशाबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदारांनी कामगारांना पी.एफ., ईएसआयसी किंवा विमा संरक्षण दिले होते का, याची तपासणी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

खासदार डॉ. काळे यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी, तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलण्याचीही मागणी केली आहे.

“निरपराध व कष्टकरी कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कोणतीही सूट मिळू नये. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे ठाम मत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले आहे.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असून प्रशासनाने तात्काळ व प्रभावी कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अन्यथा जनतेच्या भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे

.00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे-शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

भक्ती, परंपरा आणि आनंदाने भारलेली दिंडी – पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग

क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एमएफएससीडीसी’ आणि ‘एफटीआयआय’ दरम्यान सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

रंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न,महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य पावित्र्य लाभले – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta